सल्ला देणारे सुद्धा आपल्याकडे कमाल असतात.
जे कुठे तरी चमचे गिरी करत आहेत. नाहीतर कुठे कोणाच्या गाड्या धुण्याच काम करत आहेत.
नाहीतर कुणाच्या दुकानात झाडू मारायच किंवा मग सतरंज्या उचलायच काम करत आहेत.
नाहीतर कुणाच्या लेकरा बाळांना शाळेत घेऊन जायच आणि आणायच काम करत आहेत.
नाहीतर कुणाच्या घरचा भाजीपाला आणि किराणा दररोज बाजारातून आणून देण्याच काम करत आहेत.
तर हेच लोकं आधी आपल्या गावात सल्ला द्यायला समोर येतात.
म्हणजे आम्ही फलाणा ढमक्या च्या घरी झाडू मारायच काम करत आहो तर आम्ही सतरंज्या उचलायच काम करतो तर आमचा सल्ला मोलाचा; म्हणजे यांचे सल्ले ऐकून मग बाकीचे जेवढे ज्यांना पटल ते सुद्धा मग तिकडे
आपल्याला त्यांच्या गाड्या धुतानां, त्यांचा घरचा भाजीपाला आणतांना, त्यांच्या कुत्र्यांना फिरायला घेऊन जातांनाचे चित्र पुढे लोकांना मग बघायला मिळते .
तर आशा लोकांचे सल्ले किती मौल्यवान म्हणायचे आणि त्यामुळे खरच का या सल्ल्यामुळें लोकांचे प्रश्ण सुटतात की यांना बस कुत्र्यांना त्यांच्या फिरायला घेऊन जायच, त्यांचा गाड्या धुण्याच्, किंवा सतरंज्या उचलण्याच
किंवा मग नाचायचं काम हे जीवनभर ही करत राहावं लागत किंवा मग पुढे आणखी कुठे कुठे चकरा माराव्या लागतात आणि कुठे कुठे तीच कामे करावी लागतात .
मात्र, मुलांना म्हणा किंवा लोकांना या काळात जर का योग्य सल्ले मिळाले , त्यांचा त्यांचा क्षेत्रातील विशेषज्ञांकडून तर ,आपल्याला बघायला मिळते कि अनेक विद्यार्थ्यांचा आणि लोकांच्या जीवनात योग्य ते सकारत्मक बदल घडत आहेत ,
कधी कधी त्या साठी आपल्याला पैसे सुद्धा मोजावे लागतात , आणि कधी कधी अश्या प्रकारची लोक आपल्याला सुदैवाने मिळतात.







