महाराष्ट्रात बहुतेक भागांत त्यांच्या स्वतःच्या लोकांचे व्यवसाय फारसे वाढताना आणि त्या व्यवसायांची भरभराट होताना दिसत नाही . का? कारण आपण आपल्या लोकांना महत्त्व देत नाही.
पण आपल्याकडे वेगवेगळ्या प्रदेशातून येणारे व्यवसाय आपल्याला बघायला मिळते कि ते अधिक वेगाने आपल्या राज्यातील वेगेवेगळ्या भागांत वाढत आहेत मग तुम्ही महाराष्ट्राच कोणतंही शहर, गाव आणि खेडं असो ते घेऊन घ्या .
शिवाय, बाहेरून येणाऱ्या उद्योगांना इथे मोठ्या प्रमाणात कामगार मिळतात आणि आणि यामध्ये आपण पुढे आहोत दरवर्षी आपलं राज्य ८०% अधिक कामगार निर्माण करतो आणि ही नक्कीच आश्चर्याची बाब आहे . अनेक बाहेरून येणाऱ्या व्यवसायांना त्यांच्या वस्तू आणि उत्पादन आणि त्यांच्या सेवा खरेदी करण्यासाठी सुद्धा मोठं मार्केट हे आपलंच आहे आणि ग्राहक सुद्धा आपल्याकडे प्रचंड प्रमाणात आहे. ऑनलाईन शॉपिंग मध्ये देशात सर्वात आघाडी वर आपल्याकडील लोक आहेत .
शिवाय, लोकांनी बाहेरून आणून इथे आपल्याकडे काहीही विकलं तरी आपल्याकडे त्या वस्तू अगदी सहजपणे विकल्या जातात, हे सत्य आहे.
म्हणून जर लोकांकडे पैशे नसले तरी किंवा ते रिकाम्या हाताने आले तरी काही वर्षांत ते येथे बऱ्यापैकी श्रीमंत झाले आहेत असं चित्र आपल्याला बघायला मिळते आणि आपण दुसऱ्या बाजूला आपले लोकं बघतो , ते त्यांच्या जमिनी विकताना आणि त्यांचे व्यवसाय दररोज बुडताना बघतो . शेतकरी आपल्याकडे दररोज आणि दरवर्षी संघर्ष करताना आणि मोठ्या कर्जात बुडालेला दिसतो आणि त्यांच कर्ज दरवर्षी कस वाढत आहे हे त्यांना सुद्धा कळत नाही अशी परिस्थिती असते .
त्यांना अपेक्षा असते कि त्यांचा जीवनात त्यांचा , मुलाबाळांच्या जीवनात काहीतरी बदल होईल मात्र दरवर्षी घेतलेल्या पिकातून मिळालेल्या रकमेपेक्षा त्यांच्या कर्जाची रक्कम ही मोठी असते . तर यांच्या जीवनात कधी चांगले बदल येत नाहीत .त्यामुळे मग त्यांना पर्याय नसल्यामुळे त्यांचा जमिनी अव्वाच्या सव्वा किमतीला विकावी लागतात आणि अनेक शेतकरी त्या प्रकारे दररोज रस्त्यावर येताना दिसतात आणि आपल्याच गावात भिकारी म्हणून आणि अन्नाविना आणि निवाऱ्याविना जगतात .
इकडे आपल्या कडे मनोरंजन इंडस्ट्री आहे .मराठी मनोरंजन इंडस्ट्री आहे . मात्र मराठी नाटके, मराठी चित्रपट येथे आपण पाहतो की आज आपल्याच मातीत आणि आपल्याच लोकांनी मराठी नाटकांकडे, मराठी चित्रपटांकडे पाठ फिरवली आहे आज मराठी मनोरंजन जगाला वाईट दिवस आहेत.त्यांना आज आपले चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी चित्रपटगृह मिळत नाही आणि मिळाले तरी आपल्याच लोकांनी त्या चित्रपटांकडे आणि नाटकांकडे पाठ फिरवली आहे असं चित्र अनुभवयाला मिळत आणि त्यामुळे आपल्याकडील कितीही गुणवत्ता असलेले कलाकार असो .त्यांची गुणवत्ता पुढे वाया जाताना दिसते . तर याला कोण जबाबदार आहे ? हे आपल्याला समजणे आवश्यक आहे .
आणि तिकडे दक्षिणेत, आज चित्र काय आहे बघा ,त्यांचे प्रत्येक चित्रपट आणि त्यांची गाणी, अगदी ती डब केलेली गाणी असली तरी आणि त्यांचे कोरिओग्राफ केलेले नृत्य देखील आज सर्वत्र लोकांना खूप आवडतात. आणि दुसरीकडे आपण पाहतो की आज आपली परिस्थिती काय आहे आणि आपण किती समस्यांना तोंड देत आहोत.
तर हे फक्त त्या क्षेत्रापुरताच मर्यादित नाही. व्यापारउधोगाच्या क्षेत्रात aani अनेक वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्याच राज्यात लोकं मागे पडत चालले आहे आणि आज लोकांसाठी परिस्थिती अधिक कठीण आहे आणि त्यासाठी कोणाला दोष द्यायचा हे आज आपल्याला समजणे आवश्यक आहे.







