गुजरातच्या वडोदरा येथे काँग्रेस चे नेते राहुल गांधी यांनी नुकतीच भेट दिली. तिथे ते आदिवासी अधिकार विकास सम्मेलन मध्ये भाग घेण्यासाठी आले होते .
आपल्या भाषणात ते म्हणाले कि देशात आदिवासी लोकांचे प्रश्न अधिक आहेत आणि मोदी सरकार आदिवासींचे प्रश्न समजून घेऊ शकत नाही आहे .
त्यांना आता सुद्धा वनवासी समजल्या जात आणि त्यांनी आता सुद्धा वनात आणि जंगलातच राहावं असा आता सुद्धा मोठ्या प्रमाणात लोकांचा समज आहे; त्याचबरोबर ते म्हणाले कीं आता सुद्धा त्या लोकांना सरकारी नौकरी मध्ये किंवा पोलिसात किंवा शासनाच्या मोठमोठ्या पदांवर बघायला मिळत नाही.
त्याचबरोबर नौदलात , वायुदलात किंवा आर्मी मध्ये सुद्धा मोठ्या मोठ्या पदावर यांची लोकं कमी दिसतात किंवा ज्युडिशियरी मध्ये आज सुद्धा या लोकांना फार कमी स्थान मिळत , मुळात आदिवासींचे मुलं या क्षेत्रात दिसतच नाही असं त्यांचं म्हणणं होत .
ते पुढे म्हणाले कि देशात आता सुद्धा आदिवासी लोकांचे प्रश्न मोठे आहेत आणि ज्या वेगाने शाळा महाविद्यालयांचं खाजगीकरण होत आहे त्यामुळे या लोकांचा मुलांना चांगल्या शाळा महाविद्यालयात सुद्धा प्रवेश घेता येत नाही.त्यामुळे यांची लोकं पुढे आणखी शिकून शासनाच्या वेगवेळ्या विभागात जाताना बऱ्याच कमी प्रमाणात दिसतात .त्यामुळे या परिस्थिती मध्ये भाविषयात बदल होणे आवश्यक आहे असं ते म्हणाले, त्याचबरोबर त्यांचा जीवनात सुद्धा बाकीचा समाजातील लोकांसारखे चांगले बदल होणे आवश्यक आहे .
त्यांचा लोकांना मोठ्या प्रमाणात मुख्य प्रवाहात येणे आज आवश्यक आहे अश्या प्रकारचा भावना या आदिवासी अधिकार विकास सम्मेलनामध्ये त्यांनी मांडल्या.
त्याचबरोबर शाळा महाविद्यालये हे आज मोठं मोठ्या उद्योगपत्यांचा हातात जात असल्यामुळे , इथे या खाजगी शाळांमध्ये आदिवासींच्या मुलांना प्रवेश घेणे अवघड असते .आणि यांचा जमिनी सुद्धा वेगवेळ्या कारणाने सरकार बळकावून घेतो आणि यांना थोडा बहुत मोबदला देऊन तिथे त्यांचा जमिनीवर मोठमोठे कारखाने किंवा शाळा महाविद्यालये उभे होतात .
अश्या प्रकारचा भावना लोकसभेचे विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या संमेलनात आदिवासी बांधवाना संबोधताना व्यक्त केल्या.






