भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महायति सरकारवर हल्लाबोल करताना , मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वर हल्लाबोल करताना म्हंटल कि,
सकल राज्य उत्पन्न आणि दरडोई उत्पन्नात गुजरातची विशेष प्रगती झालेली बघायला मिळते आपल्याला बघायला मिळत आहे.
यात गुजरातचा वाटा ८ टक्क्यांपेक्षा अधिक.दरडोई उत्पन्नात गुजरातने महाराष्ट्राला मागे टाकले.तेलंगणा, गुजरात, हरियाणा, तामिलनाडू, पंजाब ही राज्ये महाराष्ट्राच्या पुढे गेली.
२०१० मध्ये १५ टक्के वाटा असलेल्या महाराष्ट्राची पिछेहाट होऊन हा वाटा १३ टक्क्यांपर्यंत घटला आहे. गुजरात राज्य स्वबळावर आपली प्रगती करत नसून महाराष्ट्राच्या वाट्याच्या गोष्टी हिरावून आपला विकास साधत आहे. त्यामुळे भाजप सत्तेत राहिल्यास महाराष्ट्र आणि गुजरात ही दोन्ही राज्ये आपला विकसित असल्याचा दर्जा गमावून बसतील.
दक्षिणेत भाजपची सत्ता नाही. तिथल्या राज्यांनी प्रगतीची नवी वाट धरल्याचे दिसून येते.
गेल्या दशकभरात राज्याची आर्थिक पिछेहाट झाल्याचा निष्कर्ष खुद्द पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेने काढला आहे. भ्रष्टयुतीच्या भूलथापांना आता महाराष्ट्र बळी पडणार नाही या प्रकारे हल्ला नाना पटोले यांनी आपल्या सोसिअल मीडिया हॅन्डल वरून महायुती सरकारवर केला.