आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यंमत्री श्री देवेंद्र जी फडणवीस हे भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी बोलाविलेल्या विवीध राज्यांचा मुख्यमंत्र्यांचा बैठकीत उपस्थित होते .
या दरम्यान त्यांनी समाजमाध्यमांवर जनतेला माहिती दिली कि जागतिक युद्धजन्य परिस्थितीच्या पार्शवभूमीवर देशाची तयारी, त्याचबरोबर केंद्र आणि राज्यांमध्ये समन्वय मजबूत ठेवणे आणि सामान्य नागरिकांवर कोणताही अतिरिक्त भार पडू न देणे, या बतीत या बैठकीमध्ये दिशा ठरवण्यात आली .
या दरम्यान महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या राज्याची बाजू मांडली अशी माहिती त्यांनी जनतेला समाजमाध्यमांवर दिली .
त्याचबरोबर ते पुढे म्हणाले कि पंतप्रधान मोदी कडून राज्याचा सर्व मुख्यमंत्र्याना टीम इंडिया सारखं सातत्यपूर्ण समन्वय राखण्यास आणि आपापसात एकत्रित प्रतिसाद असायला हवा अश्या प्रकारचा सल्ला देण्यात आला . .
त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कि इंधनावरील उत्पादन शुल्कात केलेली कपात ही सामान्य नागरिकांसाठी मोठा दिलासा ठरली आहे;. इतर देशांमध्ये देशांमध्ये जेव्हा २०% ते ३०% दरवाढ होत असताना केंद्र सरकारने हा भार स्वतः उचलत नागरिकांवर बोजा वाढू दिला नाही.
त्याचबरोबर त्यांनी पुढे माहिती दिली कि या बैठकीत देशाचे गृहमंत्री श्री अमित शहा त्याचबरोबर देशाचे संरक्षण मंत्री राजनाथसिंग यांची सुद्धा तिथे उपस्थिती होती . .






